India Cancer Cure : कार-टी पेशींचे चमत्कारिक यश ! भारतीय डॉक्टरांनी घडवला इतिहास

Top Trending News    22-May-2025
Total Views |

t cell
 
दिल्ली : ( India Cancer Cure ) भारतीय डॉक्टरांनी अवघ्या नऊ दिवसांत रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) पूर्णपणे बरा करण्यात यश मिळवले आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच कार-टी पेशी रुग्णालयातच तयार करून रुग्णाला देण्यात आल्या आहे. या उपचारानंतर 80 टक्के रुग्णांमध्ये 15 महिन्यांनंतरही कर्करोग पुन्हा दिसून आला नाही, असा दावा आयसीएमआरने केला आहे. त्यांच्या मते, या चाचणीतून कर्करोगाचा उपचार स्वस्त, जलद गतीने करता येईल. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ही वैद्यकीय क्षेत्रातील ( India Cancer Cure ) सर्वात मोठी कामगिरी केली आहे.
 
भारत सध्या स्वदेशी जैव-थेरपी विकसित करण्यात आघाडीवर आहे. जागतिक स्तरावर ही कामगिरी खूपच महत्वाची मानली जात आहे. आयसीएमआर आणि सीएमसी वेल्लोर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही चाचणी पार पडली. या प्रकल्पाला ‘वेलकार्टी’ असे नाव देण्यात आले आहे. भारतातील कार-टी थेरपीची ही पहिलीत चाचणी नाही. इम्युनो अॅक्ट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी एकत्रितपणे पहिली स्वदेशी थेरपी विकसित केली होती. ज्याला 2023 मध्ये केंद्राकडून मान्यता देखील मिळाली होती. डॉक्टरांनी तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) आणि मोठ्या बी-सेल लिम्फोमा (एलबीसीइल) ग्रस्त रुग्णांवर कार-टी थेरपीची चाचणी केली असून, या प्रक्रियेत रुग्णाच्या स्वतःच्या टी-पेशीला (रोगप्रतिकारक पेशी) कर्करोगाशी ( India Cancer Cure ) लढण्यासाठी सक्षम बनवले जाते.
 
किंमत परदेशी उपचारांपेक्षा 90 टक्क्यांनी कमी
 
सीएमसी वेल्लोर येथील डॉक्टरांनी सांगितले की, ही प्रक्रिया रुग्णालयातच स्वयंचलित मशीन वापरून करण्यात आली. त्यासाठी सुमारे 9 दिवस लागले. भारतात कॅन्सरचा उपचार महाग ( India Cancer Cure ) आहे. तसेच, बहुतांश रुग्णांकडे विमा नाही. या थेरपीमुळे उपचार खर्च 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. जागतिक स्तरावर कार-टी थेरपीची किंमत सुमारे 3 ते 4 कोटी रुपये आहे. ‘वेलकार्टी’ मॉडेलमुळे हा उपचार खूप कमी दरात उपलब्ध होणार आहे. भारतात दरवर्षी 50 हजार नवीन ल्युकेमिया रुग्ण आढळत आहेत.
 
जागतिक स्तरावर कार-टी थेरपीला किमान पाच आठवडे म्हणजेच 40 दिवस लागतात. भारतीय चाचणीत रुग्णांच्या ताज्या पेशींचा वापर करण्यात आला. ज्यामुळे जलद पुनर्प्राप्ती झाली. या प्रक्रियेची किंमतही परदेशी उपचारांपेक्षा 90 टक्क्यांनी कमी आहे, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.