पुणे : ( Recruitment Halt ) शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता आता निर्माण होत आहे. 2005 नंतर सुरू झालेली ही प्रक्रिया आता थांबते की काय अशी चर्चा सुरु आहे. यामुळे, हजारो उमेदवारांचे भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती अजूनही झालेली नाही. ही बंदी रद्द करण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला आहे. त्यांच्या या मागणीला 2019 च्या सुधारित आकृतीबंधाचा आधार मिळाला होता, एवढ्यातच 2019 ला शासनाने नवा आकृतीबंध जाहीर केला आहे. यावर शासनाने कुठलीही प्रतिक्रिया डेली नाही, शासन मौनाच्या भूमिकेत आहे.
30 हजार पदांची पदभरती
नव्या आकृतिबंधनुसार राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17 हजार 695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4 हजार 912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे असणार होती. तर ग्रंथपालांची 2 हजार 118 पदे, प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची 4 हजार 685 पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहायक उच्च माध्यमिक 2 हजार 40 पदेही निर्माण केली जाणार आहेत. यातून अंदाजे 30 हजार पदभरती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. हीच पदभरती आता स्थगित ( Recruitment Halt ) करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांसारख्या संघटनांनी लढा उभारत न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला. तसेच, रस्त्यावर उतरून संबंधित पदभरती करण्यास शासनाला भाग पाडले होते. त्याचा परिणाम झाला आणि पदभरती सुरू देखील झाली होती. परंतु, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक महेश पालकर यांनी एका परिपत्रकाव्दारे संबंधित पदभरती स्थगित ( Recruitment Halt ) करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतिबंध जाहीर करून पदभरती करण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार, भरती प्रक्रिया सुरूही झाली होती. परंतु, आता 2024-25 च्या संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरतीला स्थगित देण्यात आली आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून कर्मचारी भरती बंदच होती. आणि आता संचमान्यतेचे कारण देत पदभरती पुन्हा स्थगित ( Recruitment Halt ) कारण्यात आल्याने हा नवा डाव असल्याचा आरोप शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी केला आहे.