दिल्ली : ( MiG 21 Retirement ) भारताच्या हवाई सीमांचे ६२ वर्षांपासून रक्षण करणारे ‘हवाई योद्धे’ आता निवृत्त होणार आहेत. अनेक वर्षे आकाशात आपलं बळ सिद्ध करणाऱ्या या यंत्रणा आता सेवेबाहेर होणार आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानामुळे भारतीय हवाई दलाची ताकद खूप वाढली आहे. परंतु, आता या युगाचा शेवट झाला आहे. हे केवळ निवृत्तीचं नव्हे, तर इतिहासातील एक पर्व संपण्याचं लक्षण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धासह अनेक हवाई मोहिमांमध्ये भारतीय हवाई दलाची शान राहिलेले मिग-21 विमाने ( MiG 21 Retirement ) आता 62 वर्षांच्या सेवेनंतर येत्या 19 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे निवृत्त होत आहेत. चंदीगडच्या एअरबेसवर मिग-21चा शानदार समारंभात निरोप दिला जाणार आहे. भारताने 900 मिग-21 लढाऊ विमाने ( MiG 21 Retirement ) खरेदी केली होती. यापैकी 660 विमाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने देशातच बनवली होती. अहवालानुसार, सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात फक्त 36 मिग-21 लढाऊ विमाने उरली आहेत. त्यांनी अनेक दशके उत्कृष्ट सेवा दिली.
1965 च्या भारत-पाक युद्धात, 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धात, 1999 च्या कारगिल युद्धात आणि 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यात मिग-21 जेटने ( MiG 21 Retirement ) महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याची जागा तेजस एमके-1 ए लढाऊ विमानाने घेतली जाईल. मिग-21 हे जेट 1963 मध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. हे भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट आहे. हे ध्वनीच्या वेगापेक्षा (332 मीटर प्रति सेकंद) वेगाने उडू शकत होते. या लढाऊ विमानाच्या शेवटच्या 2 स्क्वॉड्रन (36 मिग-21) राजस्थानातील बिकानेर येथील नल एअरबेसवर तैनात आहेत. त्यांना क्रमांक 3 स्क्वॉड्रन कोब्रा आणि क्रमांक 23 स्क्वॉड्रन पँथर्स म्हणून ओळखले जाते.
'उडणारी शवपेटी' आणि 'विधवा निर्माता'
संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 400 हून अधिक मिग-21 विमाने ( MiG 21 Retirement ) कोसळली आहेत. यामध्ये 200 हून अधिक वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या कारणास्तव, या लढाऊ विमानाला 'उडणारी शवपेटी' आणि 'विधवा निर्माता' असे म्हटले जाते. 8 सप्टेंबर 2023 पासून या विमान ताफ्याच्या उड्डाणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय सैनिक शहीद झाले. दोन आठवड्यांनंतर, 26 फेब्रुवारीला हवाई दलाने मिग जेट विमानांनी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या हवाई हल्ल्यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 बायसन विमानही ( MiG 21 Retirement ) कोसळले. त्यांना पाकिस्तानने ओलीस ठेवले होते. मात्र, नंतर भारताने त्यांना परत आणले. 2019 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.
2021 नंतर 7 वेळा झाले अपघात
5 जानेवारी 2021: राजस्थानमधील सुरतगड येथे मिग क्रॅश झाला.
17 मार्च 2021: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ मिग-21 बायसन विमान कोसळले.
20 मे 2021: पंजाबमधील मोगा येथे मिग-21 चा दुसरा अपघात झाला.
25 ऑगस्ट 2021 : राजस्थानमधील बारमेर येथे मिग-21 पुन्हा एकदा अपघाताचा बळी ठरला.
25 डिसेंबर 2021: राजस्थानमध्येच मिग-21 बायसन विमान कोसळले.
28 जुलै 2022: राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-21 विमान कोसळले.
8 मे 2023: राजस्थानमधील हनुमानगड येथे मिग-21 विमान कोसळले.
8 मे 2023: राजस्थानमधील हनुमानगड येथे मिग-21 विमान कोसळले.