नवी दिल्ली : ( Air India Express ) मुंबईला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान बुधवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर उड्डाण करू शकले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विमानात सुमारे १६० प्रवासी होते. या विमानाचे उड्डाण थांबविण्याचे कारण तांत्रिक बिघाड सांगण्यात आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, दिल्लीहून निघालेल्या विमानाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला प्राधान्य देत किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ए ३२० विमानाने चालवलेल्या या विमानाच्या कॉकपिटमधील वेगाशी संबंधित पॅरामीटर्स दर्शविणाऱ्या स्क्रीनमध्ये बिघाड असल्यामुळे पायलटने उड्डाण न घेण्याचा निर्णय घेतला.
प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि पर्यायी विमानात हलवण्यात आले नंतर मुंबईला रवाना झाले. त्यांनी गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी सांगितले की एअरलाइनसाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. बुधवारी, दोहाला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे दुसरे विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर सुमारे दोन तासांनी कोझिकोडला परतावे ( Air India Express ) लागले.